Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

लुईस पाश्चर

जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.. फ्रान्समधल्या एका गावात कुणी तरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किंकाळी ऐकली.. किंचाळणाऱ्या मुलाचं नाव होतं ‘निकोल’ अन् ती ऐकणाऱ्याचं नाव होतं ‘ लुईस .’ निकोलला कुत्र्यानं चावा घेतला अन् गर्दी जमा झाली.. निकोल किंचाळतांनाचा कुत्र्यासारखंच दात विचकून गुरगुरू लागला-त्याचं शरीर आकुंचन पावलं-त्याला पाण्याची भिती वाटू लागली-हळूहळू तो इतरांनाही चावण्याचा प्रयत्न करू लागला...महिन्याभरात निकोल देवाघरी गेला आणि त्याचं किंचाळणं चाळीस वर्षे ऐकू येणारा त्याचा मित्र पुढं जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला..पन्नास वर्षीय त्या शास्त्रज्ञाचं संपुर्ण नाव होतं ‘ लुईस पाश्चर ’.  लुईस यांनी या काळात अनेक संशोधनं केले पण त्यांच्या कानात रोज निकोलच्या किंचाळण्याचा आवाज येत राहिला मग त्यांनी चावणाऱ्या-पिसाळलेल्या कुत्र्यांवर संशोधन सुरू केलं...मदतनीस रक्स च्या सहाय्यानं त्यांनी अश्या काही कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात डांबलं आणि त्यांच्या तोंडाचा फेस-लाळ परीक्षानळीत जमा करत गेले..या लाळेचं इंजेक्शन जेव्हा नाॅर्मल कुत्र्याला दिलं गेलं तेव्हा ते ही पिसाळल्यासारखं करू लागलं.....

मनातलं शब्दात

मनातलं शब्दात            काल मी व माझी मैत्रीण छाया बाजारात जायला निघालो . समोरच  बस उभी  होती. म्हंटल चला आज बसने जाऊ .बस मधे चढ़णे उतरणे  म्हणजे या वयात तसं सोपं नसतं. पण मधुन मधुन मला हे अस करायला आवडत .आपला confidence पण वाढतो.  व पैसेही वाचतात ना. आपली पीढी पैसे वाचवायचा  एकही   Chance  सोडत नाही. वीस मिनिटे चालून ,वीस रुपये वाचविणे, छान जमते आपल्याला .व काही तरी विशेष केल्याचे समाधान ही मिळते . नवीन पीढीला  हे  पटण्यासारखे  नाही. व आवडत तर त्याहूनही  नाही.  असो,  यालाच  जनरेशन गॅप म्हणतात .             मी व छाया बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .आमच्याच  बरोबर चढलेली  एक बाई  सहज तेथे बसू शकत होती .पण तिने ती सीट मला दिली.  पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा तिने आपली सीट दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा  घडला. ही बाई अगदी सामान्...

विठा

तमाशा किंवा तमाशा कलावंत म्हटले की लोकं नाक मुरडतात नाही तर तोंड वाकडे करतात.त्यांना समाजात फारसा मान दिला जात नाही. पण त्यांच्या मध्ये ही किती " टॅलेंट " असतो हे बघा....स्वतंत्र भारताच्या प्रत्यक्ष "राष्ट्रपतींना"देखिल ,दोन मिऩीटे "थांबा" असे सांगणारी ...... सतत दोन वेळा " राष्ट्रपती पारीतोषीक " मिळवणाऱ्या " विठाबाई भाऊ नारायणगांवकर ..." सन 1946 साली , कराड तालूक्यातील, 'गोळेगांव' मुक्कामी त्यावेळचे नावाजलेले दोन फड समोरासमोर 'सामन्या'साठी ऊभे ठाकले होते..! एक होता, भाऊ अकलेकर , तर दुसरा होता भाऊ नारायणगांवकर... यांच्या सवालजवाबातील जुगलबंदी पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला असताना , केवळ तमाशात 'स्त्रिनर्तीका' नाही म्हणून कै.भाऊ नारायणगावकरांना हार पत्करावी लागली..!! ऊभ्या महाराष्ट्रात भाऊंनी आत्तापर्यंत "हार" पाहीली नव्हतीच.... हा अपमान भाऊंच्या जिव्हारी लागला होता..!! त्यावेळी "विठा" , कै.मामा वरेरकरांच्या कलापथकात, मुंबईमध्ये काम करीत होती. स्वत: भाऊंनीच तिची अभिनयातील निपुणता वाढवण्यास...

भारतातली पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर

डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५५ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं. Dr. Rakhmabai Raut भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर त्याकाळात बाईला ब्र काढणंही मुश्कील होतं, तो हा काळ.... त्यावेळी बंड करणारी, अनिष्ट चाली-रुढींविरोधात एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्यायाव्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई... डॉ. रखमाबाई भिकाजी राऊत... भारतात डॉक्टरकी म्हणून व्यवसाय करणारी पहिली डॉक्टर अशीही तिची ओळख... भारतातल्या पहिली डॉक्टर होण्याचा मान जरी आनंदीबाई जोशींना मिळत असला, तरी आनंदी जोशींनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली नाही... भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून डॉ. रखमाबाई राऊत हेच नाव इतिहासात लिहिलं गेलं. 'मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही' रखमाबाईची गोष्ट प्रचंड प्रेरणादायी... अठराव्या शतकात मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही, हे सांगण्याचं धाडस या रखमेनं दाखवलं... रखमाबाईची ही गोष्...

सुन्दर चेहरा या सुन्दर व्यवहार

एक सभा में गुरु जी ने प्रवचन के दौरान एक 30 वर्षीय युवक को खडा कर पूछा कि, "आप मुम्बई मेँ जुहू चौपाटी पर चल रहे हैं और सामने से एक सुन्दर लडकी आ रही है , तो आप क्या करोगे ?" युवक ने कहा - "उस पर नजर जायेगी, उसे देखने लगेंगे।" गुरु जी ने पूछा - "वह लडकी आगे बढ गयी , तो क्या पीछे मुडकर भी देखोगे ?" लडके ने कहा - "हाँ, अगर धर्मपत्नी साथ नहीं है तो। (सभा में सभी हँस पडे)" गुरु जी ने फिर पूछा - "जरा यह बताओ वह सुन्दर चेहरा आपको कब तक याद रहेगा ?" युवक ने कहा  - "5 - 10 मिनट तक, जब तक कोई दूसरा सुन्दर चेहरा सामने न आ जाए।" गुरु जी ने उस युवक से कहा - "अब जरा कल्पना कीजिये.. आप जयपुर से मुम्बई जा रहे हैं और मैंने आपको एक पुस्तकों का पैकेट देते हुए कहा कि मुम्बई में अमुक महानुभाव के यहाँ यह पैकेट पहुँचा देना...  आप पैकेट देने मुम्बई में उनके घर गए। उनका घर देखा तो आपको पता चला कि ये तो बडे अरबपति हैं। घर के बाहर 10 गाडियाँ और 5 चौकीदार खडे हैं।  उन्हें आपने पैकेट की सूचना अन्दर भिजवाई , तो वे महानुभाव खुद बाहर आए। आप से पैकेट लिय...

कथा-अनारसे

अनारसे...     "आता रडणं पुरे कर बेटा,..संकट येतच असतात त्यांना तोंड देत आपल्याला जगावंच लागतं  ग,..हे सत्य आहे..हिम्मत हरु नकोस,..नवऱ्याला कंपनीत झालेल्या अपघातात त्याचे डोळे गेले होते,....लवकरच विधवा झालेल्या काकी स्वतःच दुःख विसरून सुरुच्या पाठीवर हात फिरवत  तिला समजावत होत्या,.." चारवर्षांपूर्वीच अपार्टमेंट मध्ये लग्न होऊन राहायला आलेली हि सुरू माहेर नाही म्हणुन कोमेजलेली होती,..लहानपणीच आई वडील वारले आणि सांभाळणारी आत्याही लग्नानंतर महिन्यात गेली,.. अजयशी लग्न करून आलेली सुरू पोरकी होती,..पण लाघवी आणि बोलकी होती,..कोणाच्याही हाकेला धावणारी होती,..विधवाकाकीच्या मुलाच्या अपघातात मनापासुन मदत केल्याने सुरू काकीच्या अधिकच जवळ आली,..पहिल्या अधिक मासात काकीने सुंदर अनारसे करून लेक जावई म्हणत वाणही दिलं होतं सुरुला,..एक गोड नातं दोघीत निर्माण झालं होतं,...        आता सुरुला उभं करणं गरजेच होतं,.. आर्थिक अडचणी येणारच होत्या,... सुरूच शिक्षणही फारसं नाही मग काहीतरी उद्योगच करता आला तर असं काकींच्या मनात आलं ,नेमका आलेला अधिक मास काकी फार वर्षांपूर्वी अ...

पबजी आणि युवाशक्ती

पबजी आणि युवाशक्ती सुप्रभात, नमस्कार.  एक बातमी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल की भारत सरकारने चीनचे ११८ ऍप बॅन केले, ज्यामध्ये पबजी (PUBG) ऍप देखील शामील आहे. पबजीचे (PUBG)  सर्वात जास्त ऍक्टिव्ह युजर्स (Active Users) भारतात होते आणि आतापर्यंत २२००० करोडपेक्षा जास्त पैसे ह्या ऍपच्या मालकाने पबजीमधून (PUBG) कमावलेले आहेत. याआधीही भारत सरकारने चीनचे ५९ ऍप बॅन केले होते, ज्यामध्ये टिकटॉक (TikTok) सारखा फेमस ऍपदेखील शामील होता.  या बातमीवरून एक वैतागलेला पुणेकर म्हणतो, ‘अख्खा भारत चीनचे ऍप वापरतोय..! मग भारतातील पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत ते काय करताय? का यांचा जन्म फक्त नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रिजला ट्रॅफिक जाम करायला झालाय?’   या माणसाचं बोलणं सर्वजण हसण्यावारी घेताहेत; परंतु खरंच हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा आहे का? आपल्या देशात जगातील सर्वात जास्त इंजिनीअरर्स आहेत. जगातील सर्वात तरुण युवक आपल्या देशात आहेत त्यामुळे साहजिकच सर्वात जास्त क्रिएटिव्हीटी आपल्या देशात हवी होती; परंतु तसे अजिबात दिसत ...

मनाची अफाट शक्ती

मनाची अफाट शक्ती लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या 5-15 वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. बलात्कार झाले. त्यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की हे संपर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच आसतात व मी जगायला लायक नाही. ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’  होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचतात. पुढे वयाच्या 40  व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपर...

बिजांड ते ब्रह्मांड - आईची आई

मला खूप पूर्वीचा "बिजांड ते ब्रम्हांड" हा डॉ. महेन्द्र वंटे यांचा लेख मिळाला.. हा लेख वाचल्यावर हे एका डॉक्टरचे शब्द आहेत यावर विश्वासच बसत नाही... हे शब्द असेच सुचले नाहीत तर ते त्यांच्या शब्दामधून त्यांच्या अंतर्मनातील भाव, आईचे प्रेम आणि तिच्या प्रति असलेली कृतज्ञतेची तळमळ व्यक्त होतेय. थोडासा मोठा लेख आहे.. पण नक्की वाचा.. खात्री आहे की हा लेख वाचल्यावर आपणसुद्धा आपल्या अंतर्मनाशी बोलल्याशिवाय राहणार नाही. ......................... बिजांड ते ब्रह्मांड वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव नव्वदीतले. झिजलेल्या कंबरेवरचा मुक्कामार तिला कायमचा परावलंबी करून गेला.पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं. तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच. वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. पण म्हातारपण म्हणजे सुकून जिर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. सल्ला मसलतींचा पाउस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर... मनाला पटेना. अनेक पर्यांयांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचा दुष्काळ. मग मीच ठरवलं के...

देवनागरी लिपी - गणेशविद्या

देवनागरी लिपीलाच गणेशविद्या असेही म्हणतात .........................        गणपतीने ज्या वर्णसंचाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे.  त्या वर्णसंचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदललीही गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी सर्व जगासाठी, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व भाषांचे सुसंगत लेखन करण्यासाठी  अत्यंत सोयीची आहे.  यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून  होईपर्यंत उचलावी लागत नाही.  या लिपीतील चिन्हे १६ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.  ५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह (जोडाक्षरासहित) चिन्हे लिहिता येतात. अशा काही लाख चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ ५२ चिन्हांची अक्षर आकार ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना...